Share

मुंडे, महाजन असते तर त्यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या थोबाडीत मारली असती – पवार

Published On: 

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली होती. पावसाळी अधिवेशनाचे दोन्ही दिवस वादळी ठरले. काल भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यापासून भाजप आमदारांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. आज तर विधीमंडळाच्या आवारात भाजपने अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं. यावर देखील तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत माईक व स्पीकर जप्त करण्यास सांगितले.

दरम्यान, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या या कारवाई विरोधात राजभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं. तर, कोल्हापुरात भाजपच्या कृत्याविरोधात शिवसेनेनं दसरा चौकात आंदोलन केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शिवसैनिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. उठसूठ ठाकरे कुटुंबावर आरोप खपवून घेणार नाही, असं देखील यावेळी शिवसैनिकांनी भाजपला ठणकावून सांगितलं आहे.

‘उठसूठ ठाकरे कुटुंबावर आरोप खपवून घेणार नाही. काल जो विधान भवनात प्रकार घडला त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य धोक्यात आले. सत्तेसाठी लाचार झालेल्या भाजपाचे हे कृत्य अत्यंत निषेधार्थ आहे, असं म्हणतानाच आज जर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असते तर त्यांनी या 12 आमदारांच्या थोबाडीत हाणली असती, असं शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार हे पत्रकारांशी प्रतिक्रिया देताना बोलले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!