नागपूर: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला चांगलेच फैलावर धरले आहे. सरकारमध्ये काही लोक झारीतील शुक्राचार्य आहेत. ते ओबीसी आरक्षणाला विरोध करत आहेत. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनीच असा आरोप केला आहे. त्यामुळे काँग्रेसला ओबीसींची एवढीच कळकळ असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, असे वंजारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस जर ओबीसींच्या बाजूने आहे तर ओबीसी विरोधी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत कशी आहे?,असा सवालदेखील त्यांनी केला आहे.
सरकारने लवकर इम्पेरीकल डाटा गोळा करून ओबीसींना आरक्षण देण्यासाठी हालचाली कराव्यात असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच येणारी २०२२ ची निवडणूक ओबीसी आरक्षणानुसारच झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि सरकारने ते करून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

