Share

सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो आहे.

मात्र, पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. पण पुढील दोन महिन्यांचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज आज राज्यात एकूण चार जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!