Share

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आगामी टी-२० विश्वचषकासाठी पर्यायी देशाचा आयसीसी करतेय विचार

Published On: 

मुंबई : गेल्या काही आठवड्यापासुन भारतात कोरोनाच्या संसर्गाने डोके पुन्हा वर काढले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. तसेच भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतुन अनेक विदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमिवर भारतात आगामी टी-२० विश्वचषकासाठी पर्यायी देशाचा विचार आयसीसीकडून केला जात आहे.

भारतात होणारा आयसीसी टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. स्पर्धेला बराच कालावधी बाकी असला तरी, भारतातील कोरोनाची स्थिती पाहता आयसीसीने दुसऱ्या पर्यायाचा विचार सुरु केला आहे. टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने संयुक्त अरब अमिरातीला (युएई) विश्वचषकासाठीचे राखीव ठिकाण म्हणून ठेवले आहे. जर भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर, टी-२० विश्वचषक युएईमध्ये होऊ शकेल.

या दरम्यान आयसीसी सध्या भारतातील कोविडच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आयसीसीचे शिष्टमंडळ सध्या भारतात आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआयने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी नऊ मैदानांचे प्रस्ताव ठेवले होते. यादरम्यान भारतातील कोरोनाची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियाने १५ मे पर्यंत भारतातुन येणाऱ्या विमानावर बंदी घातली आहे. तेव्हा विश्वचषकासाठी इतर देशातील क्रिकेट मंडळ आपले संघ टी-२० विश्वचषकासाठी भारतात पाठवण्याचा धोका पत्कारणार का हा प्रश्न आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!