🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत घेतलेले लोकहिताचे निर्णय व केलेल्या विकासकामांची माहिती देऊन आगामी निवडणुकीसाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा शनिवारी लातूर जिल्ह्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा झाल्या.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अहमदपूरमध्ये आली असता आमदार विनायक पाटील यांनी ‘मला उमेदवारी दिली नाही तरीही मी कायम मुख्यमंत्री साहेबांसोबतच राहणार आहे. असे म्हणत मतदार संघातील उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांपासून विनायक पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर ते पक्षांतर करतील किंवा अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे.
पुढे बोलताना विनायक पाटील यांनी पक्षातील नाव न घेता काही जनांना समज देण्याची गरज आहे असं विधान केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्याकडे चाकुरसाठी विविध विकास कामे मागीतले. लातुर रोड येथुन नांदेड कडे जाण्यासाठी रेल्वे, चाकूरच्या नगर पंचायतला दोन वर्षांपासून कोणतेही काम दिले नाही त्यांनाही काम देण्यात यावे अशी मागणी केली.
दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी जनतेला तुम्ही विनायकराव पाटील यांच्या सोबत आहात का असा प्रश्न विचारला त्याला उपस्थितांनी जोराच्या जल्लोषात त्यांना दुजोरा दिला. त्यामुळे आता भाजपची उमेदवारी नक्की कोणाला मिळेल हे पाहणे खुप उत्सुकतेचे ठरणार आहे.
- भोकरदनमधील सभा माझ्यासाठी लकी : फडणवीस
- शरद पवारांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली
- सोलापूर महापालिकेचा भाजपला दणका, अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर्स हटवले
- ‘मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचा गौरव धुळीस मिळवला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
