Share

‘…म्हणजे सीबीआयचा तो अहवाल खरा आहे’; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तीन दिवसांपूर्वी सीबीआयने क्लीन चीट दिल्याची चर्चा होती. तसा सीबीआयचा एक अहवाल लीक झाला होता. त्यानंतर आमचा असा कुठलाही अहवाल नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले होते. मात्र, आज सीबीआयने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

सीबीआयने त्यांचा कर्मचारी आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना अटक केली. याचा अर्थ तो प्राथमिक चौकशीचा अहवाल खरा आहे. जेव्हा ही कागदपत्रे बाहेर आली तेव्हाच बचाव करण्यासाठी हा गुन्हा दाखल करून कारवाई केली. चार महिने हा अहवाल मॅनेज झाले किंवा कर्मचारी भ्रष्ट आहे, असे सीबीआयला वाटले नाही. पण लीक झालेला अहवाल न्यायालयात जाऊ शकतो. त्यामुळे वकिलांना अटक करतात. कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात. तथ्य नसताना गुन्हे दाखल केले जातात, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

परमवीरसिंग यांचे आरोप राजकीय हेतूने होते. सरकारला बदनाम करण्यासाठी होते. प्राथमिक अहवाल बाहेर आल्यावर तो खरा की खोटा सांगितलं नाही. आता त्या अहवालाबाबत गुन्हा दाखल करतात कनिष्ठ अधिकाऱ्याला अटक करतात. देशमुख यांच्या वकिलाला अटक करतात, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!