🕒 1 min read
कराड : मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह इतर नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी देखील राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.’महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही, असा आरोप त्यांनी केलाय. ते आज कराडमध्ये बोलत होते.
‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.
‘राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत,’ असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी संताप व्यक्त केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी
- ‘माझ्या हातावर असलेला ‘देवेंद्र’ चा टॅटू हा फडणवीसांचाच, तेच माझ्या मनात’
- अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
- ‘वसंतदादांच्या नातवाला विकत घेईल एवढा भाजप मोठा नाहीये’, विशाल पाटील यांचा हल्लाबोल
- ‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’ व्यंगचित्राद्वारे राष्ट्रवादीचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
