🕒 1 min read
सांगली : रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
मात्र, विरोधकांनी अनेक कारणांमुळे सरकारला घेरण्याचा आता प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्रात परवापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. चिपळूणमध्ये सुद्धा पाऊस पडला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळं संकट निर्माण झालं आहे यातून मार्ग कसा काढायचा या साठी विरोधीपक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. पण ते आता टीका करत असतील तर राजकारण कोण करत आहे हे समजते,’ असं जयंत पाटील म्हणाले.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘केद्रं सरकारने किती मदत केली हे माहित नाही पण नक्कीचं केद्रं सरकार मदत करेल,’ असं जंयत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या शिरगावमध्ये बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या भीषण पूरपरिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यासाठी विरोधीपक्षाने सरकारला मदत करणे अपेक्षित आहे, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गाव पाण्यात, पुणे-बंगळुरू महामार्ग बंद
- ‘हा झटपट दौरा दु:ख पुसायला आहे की कडे निखळलेला डोंगर पाहायला?’
- संभाजीराजेंच्या पत्राला बिपीन रावत यांचा प्रतिसाद, पूरग्रस्त भागात सैन्यदलाच्या तुकड्या दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
