Share

Eknath Khadse | मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात – एकनाथ खडसे

Published On: 

जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली, मात्र न्याय मिळाला नाही, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली.  कार्यकर्ते-नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. पाया मजबूत झाला, तर निवडणुकांमध्ये यश मिळेल असं यावेळी खडसे म्हणाले. मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात लोकं कामामुळे येतात. असं खडसे म्हणाले.

यावेळी बैठकीत अनेकांनी सांगितलं की आपलं सरकार असतानाही एकनाथ खडसेंना न्याय मिळाला नाही. मात्र हे खर आहे मी अनेकदा शरद पवार आणि जयंत पाटील अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र पुढे काय झाले आपण सर्वांना ठाऊकच आहे. असे म्हणत एकनाथ खडसे यांनी बोलने टाळले . सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही. यावरून खडसे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!