लातूर : शहराचा थकित वीजबिलापोटी खंडीत केलेला वीजपुरवठा महावितरणने रविवारी पुन्हा सुरु केला. रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पुर्वरत झालेल्या विजपुरवठ्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दुपारी २ वाजेच्या सुमारास पुर्वरत झाला. यादरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महावितरणच्या सहसंचालकाशी चर्चा केल्यानंतर महावितरणने वीज बिल भरण्याची मुदत वाढवून दिली आहे.
लातूर मनपाकडे महावितरणचे २ कोटी ६८ लाख वीज बिल थकित होते. ही थकबाकी लवकरात लवकर पुर्ण भरण्यासाठी महावितरणने मनपाला मुदत दिली होती. पण दिलेल्या मुदतीत वीज बिल न भरल्याने महावितरणने शुक्रवारी सांयकाळी मांजरा धरणावरील वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे संपुर्ण लातूर शहराचा पाणी पुरवठा बंद झाला. दरम्यान जिल्हाधीकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महावितरणच्या सहसंचालकाशी चर्चा केल्यानंतर महावितरणने वीज बिल भरण्याची मुदत वाढवून दिली.
यानंतर महावितरणने धनेगाव एक्सप्रेस फिडर लाईनवरुन विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. यानंतर १५ मिनीटांत पंपिंग सुरु झाले. आणि दुपारी २ वाजेच्या सुमारास धनेगाव येथून पाणी लातूर शहरात दाखल झाले आणि शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर शहरातील बसवेश्वर कॉलनी, शासकीय कॉलनी, राजधानी हॉटेल येथील पाण्याच्या टाकीवरुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम; अभिभाषणात राज्यपालांनी केले राज्य सरकारे कौतुक
- वाढदिवसादिवशी ‘हा’ क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ; कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल
- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला
- गर्लफ्रेंडचा फोटो काढत असलेल्या फोटोग्राफरवर भडकला बॉयफ्रेंड अर्जुन; अर्जुनला पाहून मलायका झाली स्तब्ध
- हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू; एसटीही बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
