मुंबई : राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव असलेले सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. कुंटे हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कुंटे यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. सीताराम कुंटे हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार २८ तारखेला निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा मंत्रालय आणि प्रशासनात होती. अखेर या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सीताराम कुंटे यांचे आजपासून सुरु होणारे अधिवेशन हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी कुंटे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुंटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. विरोधीपक्ष आक्रमक झाले असतानाच मुख्य सचिवांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्या बरोबर प्रवीणसिंह परदेशी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. मात्र प्रवीणसिंह परदेशी मुंबई महापालिका आयुक्त पदावर असताना त्यांचे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारसे न जमल्याने तसंच परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अतिशय निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राहिल्याने परदेशी यांच्यापेक्षा कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी


