मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, प्रकरण अंगाशी येताच ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महाविकास आघाडीमधील सर्व महत्वाच्या नेत्यांच्या आता या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गंभीर प्रकरणावर मौन सोडलं आहे.
‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर लागलेले आरोप हे गंभीर आहेत. सचिन वाझेंनी मनसुख हिरेन यांच्या गाडीत स्फोटकं ठेवली. सचिन वाझे यांना परमबीर सिंह यांनीच पुन्हा रुजू करून घेतलं होतं. यात गृहमंत्र्यांचा संबंध नाहीत. तर, राजीनाम्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाबाबत तेच निर्णय घेतील. त्यांनी योग्य चौकशी करूनच निर्णय घ्यावा,’ असं शरद पवार म्हणाले.
बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे पवारांचे वैशिष्ट्य. पत्रकार परिषदही तशीच होती. चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची. @PawarSpeaks @AnilDeshmukhNCP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 21, 2021
शरद पवार यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे पवारांचे वैशिष्ट्य. पत्रकार परिषदही तशीच होती. चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची,’ असं भातखळकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- ‘काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही’
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

