🕒 1 min read
अहमदाबाद : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.
दरम्यान, नियमित सलामीवीर रोहित शर्मा विश्रांतीनंतर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत राहुलला संघाबाहेर जावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सर्वांचे लागले आहे ती हिटमॅन रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे. पहिल्या दोन सामन्यांत रोहितला विश्रांती देण्यात आल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.
रोहितला तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात संधी द्यायची असेल तर किशन किंवा राहुल दोघांपैकी एकाला वगळावे लागेल. किशनचा पहिल्या सामन्यातील परफॉर्मन्स पाहता त्याला वगळण्याची चूक कोणीही करणार नाही. तर दुसऱ्या बाजूला दोन सामन्यांमध्ये केवळ एक धाव करणाऱ्या के. एल. राहुलचं संघातील स्थान अनिश्चित मानलं जातंय. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघ रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांसह मैदानात उतरेल. राहुलच्या जागी रोहितला या सामन्यात संधी दिली जाईल. उर्वरित भारतीय संघ मजबूत असल्याने या बदलांशिवाय भारतीय संघात इतर कोणताही बदल होणार नाही, असं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
