Share

जिल्हाधिकारी साहेब आपण खासदारांवर कारवाईची हिंमत दाखवाल का? सुहास दाशरथे यांचा सवाल

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर शनिवारी रात्री पैस्यांची उधळण झाली. या कार्यक्रमात आलेल्या ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लक्ष करीत खासदारांवर कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला.

वेगवेगळ्या करणाने खासदार इम्तियाज जलील हे सध्या सतत वादाच्या भवऱ्यात सापडत आहे. अब्दीमंडी येथे एका मुशायऱ्या दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. एकीकडे गरिबांसाठी झगडतो असा धिंडोरा पिटणाऱ्या खासदाराला स्वतःच्या अंगावर पैस्यांचा पाऊस पडत असताना गरिबांची आठवण तर बाजूलाच, परंतु असा उद्योग करणाऱ्या कार्यकर्त्याना जलील यांनी साध बाजूला देखील नाही सारल. त्यात या कार्यक्रमात असलेल्या ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

परंतु, खासदारांनी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनावर दबाब टाकून स्वतःला बाजूला सारले का? असा सवाल मनसे जिल्हाध्यक्षांनी केला. लोकांना भेटायला वेळ नसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासदारांची बाजू योग्य सांभाळल्याचा आरोप देखील सुहास दाशरथे यांनी केला. तसेच खासदारांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील सुहास दाशरथे यांनी या वेळी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!