औरंगाबाद : गुलमोहरासारखे भरलेले घरटे जेव्हा निर्ढावलेल्या प्रशासनाने पाडून टाकले अन तिचा संघर्ष सुरू झाला. ८ वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तेव्हापासून तिच्या नशिबी संकटांचा फेरा सुरू झाला. तेव्हापासून आजतागयात ती महानगरपालिकेचे उंबरठे झिजवत आहे. शुक्रवारी तर ती मनपा आयुक्तांच्या केबिन बाहेर अंधारात सहा तास बसून होती. उपस्थितांना पाणावलेल्या डोळ्यांनी आपली करून कहाणी सांगत मन हलके करत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त उपग्रंथपाल सरस्वती मोरे यांची ही कहाणी आहे. गेली ८ वर्षे आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने त्या लढा देत आहे. २३ मार्च २०१२ मध्ये जयसिंगपुऱ्यातील त्यांचे वडिलोपार्जित घर ज्याठिकाणी त्यांचे एकत्र कुटुंब ४० वर्षांपासून वास्तव्यास होते. ते घर पालिकेने पाडले. रस्ता रुंदीकरण होणार असल्याची नोटीस प्राप्त होताच त्यांनी आक्षेप नोंदवला. मात्र एकेदिवशी सर्व कुटुंबीय बाहेरगावी असतांना हे घर पाडले गेले. घरासह मालमत्तेचे देखील नुकसान झाले होते.
आता या त्यांच्या जागेवर गॅरेज, मंडप दुकाने, ज्युस सेंटर्सचे अनधिकृत अतिक्रमण आहे. या घटनेतून सावरल्यानंतर त्यांनी लगेचच न्यायालयात धाव घेतली. तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्याकडेही दाद मागितील. त्यानंतर अर्ज, कागदपत्रे, पुरावे, मागण्यांच्या प्रतिचे गठ्ठे घेऊन त्या विशेष भूसंपादन विभाग, नगररचना, मुख्यमंत्री कक्ष, आयुक्त, उपायुक्त अशा अनेक ठिकाणी खेटा मारत आहेत.
तत्कालीन आयुक्त भापकर ते सध्याचे आयुक्त पांडेय यांच्यापर्यंतच्या सर्व आयुक्तांची भेट मोरे यांनी घेतली आहे. मात्र, हाती काहीच आले नाही. या सर्वांपैकी आस्तिक कुमार पांडेय यांनी अर्ज वाचत आस्थेने विचारपूस केली. त्यामुळे हेच एक आयुक्त बरे वाटल्याचे त्या सांगतात. मात्र, मनपातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे तसेच दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरस्वती मोरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला सांगितले. २०१२ मध्ये पाडलेल्या जमिनीपैकी उरलेली २४.४० चौरस मीटर जमिन मिळावी, अवॉर्ड जाहिर करावा जेणेकरुन मोबदला मिळण्यात अडचण येणार नाही. एवढ्याच मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या जागेवर अतिक्रमण
सरस्वती मोरे यांच्या जयसिंगपुऱ्यातील जमिनीवर आता गॅरेज, ज्युस सेंटर, मंडप डेकोरेटर्सची दुकाने आहेत. या भागातील एका राजकीय पक्षातील नेत्याचे या विक्रेत्यांना अभय असल्यामुळेच याठिकाणी ते निर्धास्तपणे व्यवसाय करत असल्याचे मोरे यांनी सांगितले. आपण गेली ८ वर्षे भाड्याच्या घरात राहत असून वडिलोपार्जित घरच गेल्याने आपल्याला मोबदला मिळावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार असल्याचे सरस्वती मोरे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र संघाचा कर्णधार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

