Share

…म्हणून बडतर्फ सचिन वाझेंना पुन्हा रुजू करून घेतलं; पोलीस विभागाने दिलं स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत असून त्या गाडीचे मालक मुनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.

दरम्यान, सचिन वाझे यांनी तब्बल ६३ एन्काउंटर केले आहेत. तर, सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता. यानंतर, २००७ मध्ये त्याचा बडतर्फीचा कालावधी संपला होता. मात्र, पोलीस विभागावर नाराज होत त्यांनी मुंबई पोलीस मधील सेवेचा राजीनामा दिला होता.

यानंतर, २००८ मध्ये त्यांचा शिवसेनेशी देखील संबंध आला. यानंतर तब्बल १३ वर्षांनी ६ जून २०२० मध्ये सचिन वाझे यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू करण्यात आलं. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असतानाच त्यांना परत रुजू का करून घेतलं ? त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या ? असे सवाल भाजपने केले होते.

दरम्यान, सचिन वाझे यांच्या कोठडी संदर्भात एनआयए कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यांना परत रुजू करण्याचे कारण पोलीस विभागाकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना काळात आपत्ती परिस्थिती उद्भवल्यामुळे पोलीस विभागात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली होती. यामुळेच, जून मध्ये सचिन वाझे यांना रुजू करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!