औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात तसेच इतर ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदारी डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी औरंगाबादचे निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना निवेदनही दिले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील तसेच इतर ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कपाशी, मका, सोयाबीन, तूर या पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पुरामुळे शेतकऱ्यांची जनावरे देखील वाहून गेलेली आहेत. अतिवृष्टीमुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. तसेच विहिरींचेही नुकसान झाले असल्याचे डॉ. काळे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या संदर्भात डॉ. कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केली. त्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संबंधीचे पत्र पक्षातील वरीष्ठ नेत्यांनाही पाठवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागलेत’; आशिष शेलार यांचा खोचक टोला
- …म्हणून संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यात भाजपने दाखल केली तक्रार
- ‘सत्तेत आल्यावर महिलासबलीकरणाची व्याख्या बदलते का?’; चित्रा वाघ यांचा सुळेंना खोचक सवाल
- जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे ? राम कदम यांचा थेट सवाल
- ‘..मग शिवाजी महाराजांना अटक केली असती का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

