पुणे : पुण्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच गौरी गायकवाड मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पुणे ग्रामीण भागात खळबळ माजली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.
सरपंच गौरी गायकवाड तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषेद घेतली, यावेळी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या देखील यावेळी उपस्थित होत्या. पत्रकार परिषेदत बोलताना चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.
राज्याचे गृहमंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील अशा वाईट लोकांवर तात्काळ कारवाई करायला हवी, अशी मागणी यावेळी चित्रा वाघ यांनी केली आहे. सत्तेत आल्यावर तुमची महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?, असा खोचक सवाल यावेळी वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
महिला सरपंचाच्या मान मर्यादा या भंगल्या आहेत. महिलांवर अन्याय करणाऱ्या आरोपीला जामीन सुद्धा मिळता कामा नये, असा कायदा करावा लागेल. तसेच आजची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रवादी राहिलेली नाही, अशीही टीका राष्ट्रवादीवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मनी हाईस्ट’मधील ‘या’ भूमिकेत पंकज त्रिपाठीला पाहून चाहते भडकले
- ‘गरीबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्च विद्या विभूषित झाली तरच त्यांचे जीवनमान उंचावेल’
- अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढणार; ईडी दुसरा समन्स पाठवण्याची शक्यता
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- खेड : तरसाचा दोघांवर हल्ला, तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वृद्धाचा जीव वाचला


