Share

‘या’ चार जिल्ह्यांत बरसणार मुसळधार पाऊस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या भागात शेतीचे, घरांचे, रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता कुठेतरी पाऊस थांबला होता. मात्र आत पुन्हा हवमान विभागाने या भागात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.

पुढील पाच दिवसांसाठीचा म्हणजेच २९ जुलैपासून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ठाण्यात २९ जुलै तर मुंबईत 30 जुलैरोजी काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पुढचे चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.याबाबत मुंबई हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी समाज माध्यमावर माहिती दिली आहे.

रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा हा भाग आत कुठे पुराच्या नुकसानीतून ओसरत होता. मात्र आता पुन्हा एकदा या भागावर अस्मानी संकट कोसळण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. हवामान विभागाने २ ऑगस्टपर्यंतची पावसाची माहिती दिली असून, यात रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरसह इतर काही जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!