औरंगाबाद : काळाचा घात कधी कोणावर येईल याचा नेम नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना शहरातील भुईवाड्यातील उदयकॉलनीत घडली. अंघोळ करण्यासाठी केलेल्या गरम पाण्याच्या बादलीत पडून चार वर्षीय चिमुकल्याचा आज बुधवारी अंत झाला. हि घटना १४ फेब्रुवारी घडली, जय संजय काळे असे चिमुकल्याचे नाव आहे.
बाथरूम मध्ये ठेवलेल्या गरम पाण्याचा अंदाज जय ला न आल्याने, त्या गरम पाण्याच्या बादलीत तो १४ फेब्रुवारी रोजी पडला. गरम पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे त्याचे शरीर चांगलेच भाजले. हा प्रकार घरच्यांना कळताच त्याला घाटी रुग्णालयात नातेवाईक घेऊन आले.
घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. १४ फेब्रुवारी पासून त्याच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी पाहटे त्याची अचानक तब्येत खालवल्याने आणि या घटनेत गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुनगंटीवार ‘सिनियर’ असूनही तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले; देशमुखांचा चिमटा
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका; मुनगंटीवारांचा पटोलेंना मिश्किल टोला
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

