मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली होती. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर प्रहार करताना, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा यावचं लागेल असं सांगतानाच काही दिवसांसाठी झालेल्या ‘त्या’ मैत्रीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा साद घातली आहे.
‘मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही,’ अशी ऑफर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे. ‘आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका,’ असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर हक्कभंग तर अशोक चव्हाणांना…
दरम्यान, अन्वय नाईक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केला होता. यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. तर, मराठा आरक्षणावर दिशाभूल करणारे निवेदन केल्याबद्दल मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सुद्धा त्यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार नाराज ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- सव्वीस कोटींच्या ठेवी बुडवणारा चेअरमन अखेर शरण
- फडणवीसांचा आक्रमक पवित्रा; अशोक चव्हाणांना नोटीस तर देशमुखांवर हक्कभंग
- हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी शर्जिलला कोर्टाचा दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

