औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव आणि केंद्रीय मंत्री दानवे यांच्यातील कलगीतुरा संपता संपत नाही आहे. शेतकरी एल्गार परिषद घेत हर्षवर्धन जाधवांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री दानवेंना इशारा दिला आहे. कन्नड तालुका हा स्व. रायभान जाधव व तेजस्विनी जाधव या माझ्या आई वडिलांनी मोठ्या कष्टाने ऊभा केला असून, या तालुक्यात तुमचे झेंडे लागू देणार नाही.
तसेच तुमच्या मुलीच्या बॅगा उचलयाला आम्ही तुमच्या बापाचा नोकर नसुन दारू पाजुन पैसे वाटून निवडून आलेले सदस्य फोड़न्याची वाईट संस्कृति येथे रुजवू देणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.मेलो तरी तरी चालेल पण आता झुकणार नसल्याचा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता आपल्या भाषणात दिला.
तालुक्यात निवडून आलेले सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी आपल्या पदाचा अभ्यास पूर्वक उपयोग जनतेच्या विकासा करिता करावा. जनता आपली मायबाप असून मोठ्या विश्वासाने ती आपल्याला मतदान करते त्यामुळेच आपल्याला पदे मिळतात. आसुरी संपत्ती असलेली माणसे उच्च पदावर गेल्यास चांगल्या माणसाला तुरुंगात जावे लागते.
हर्षवर्धन तुरुंगात असताना त्याच्या चिंतेने माझा जीवाची घालमेल होत होती. या कठिन प्रसंगात आमच्या आदित्याने खुप हिम्मतीने काम केले. ईशा हे ईश्वराचेच एक नाव असून ती हुशार, गुणी आसल्याने तिच्या भाषणाने मि प्रभावित झाले आहे. तालुक्यातील जनतेच्या विकासाकरिता जाधव कुटुंब अहोरात्र जनते सोबत असून हर्षवर्धन व ईशा या दोघांना संभाळून घ्या अशी साद माजी आमदार तेजस्विनी जाधव यानी उपस्थितीत जनतेस घातली.
महत्वाच्या बातम्या
- मित्रानेच दारू पाजून केला खून; लखन सोनवणेच्या मृत्यूचे रहस्य उलगडले
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
