Share

राज्यात गारपीट, अवकाळी पाऊस; वीज पडून ६ ठार; शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

Published On: 

🕒 1 min read

जालना : राज्याला बुधवारी रात्री विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. यात मराठवाडा आणि विदर्भात वीज पडून एकूण ६ जण ठार झाले.नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात माधव दिगंबर वाघमारे (५०), तर चिंचखेड येथे आनंदराव शामराव चव्हाण (६५) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात तडेगाव येथील राहुल रामसिंग सुंदरडे (२७) यांचा वीज पडून मृत्यू झाला.

मराठवाड्यात नांदेड, हिंगोली भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड आणि जालना जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा बसला. यामुळे शेतातील रब्बी हंगामातील पिके उद्धवस्त झाली आहेत. आधी अतिवृष्टी, पुरामुळे खरीप हंगाम हातचा गेला, आता गहू, हरभरा, ज्वारी, कांदा ही रब्बी पिकेही उद्धवस्त झाली. यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

अवकाळी पावसाने राज्यभरात पिके भुईसपाट
मराठवाडा, विदर्भासह नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना गारपिटीने झोडपले. कोल्हापूर, सांगलीतही बुधवारी आणि गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा उद्धवस्त झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नाशिकमध्ये द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. तर कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील जोगेवाडी धनगरवाड्यावर बर्फवृष्टी झाली. कोकणातही पनवेल, कामोठे येथेही विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!