Share

GulabRao Patil | “…तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”; गुलाबराव पाटील यांचं चॅलेंज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची टोलेबाजी सुरू असलेली आपल्याला दिसून येतं असेल. अशातच शिवसेना पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य करत चॅलेंज दिलं आहे.

लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे-

मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्‍यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन घोषणा निघाल्या आहेत. परंतू ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहाव. तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर नवव्या दिवशी आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.

 शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती गुलाबराव पाटील म्हणाले-

तसेच, आगामी काळातील निवडणूकांमध्ये शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनी युती करून लढण्याचे ठरवले आहे. या पक्षांच्या युतीवरही गुलाबराव पाटील यांनी आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा नुकसान होईल हे सांगता येत नाही.

दूध का दूध पाणी का पाणी होईल-

शेवटी निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे घोडा मैदान आता जास्त दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत आहेत. चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!