Share

Sanjay Jadhav | “लोभाला मर्यादा असावी” ; शिवसेना खासदार संजय जाधव यांचा शिंदे गटावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय जाधव यांनी सध्याच्या संकटातून पक्ष बाहेर पडेल, असा विश्वास व्यक्त केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला फटकारले. लोभाला मर्यादा असावी, असा टोला जाधव यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले आहे. शिंदे आणि 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेवर नवे संकट उभे ठाकले आहे. मंगळवारी पक्षाच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि त्यांना संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पक्षाचा नेता बदलण्याची विनंती केली.

जाधव म्हणाले, “शिवसेनेने आजवर मला जे काही दिले ते माझ्या अपेक्षेपलीकडचे आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शिवसेना इतक्या सहजासहजी उद्ध्वस्त होईल, असा विचार कधीच करू नये.”

“शिवसेना संकटातून जात आहे, पण ही वेळ निघून जाईल. 1984 मध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) फक्त दोन खासदार होते, पण आज ते राज्य करत आहेत. त्यामुळेच बाळ ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे विखुरली जाईल, असा विचार कोणी करू नये,” असे संजय जाधव म्हणाले.

“शिवसेनेनेच आम्हाला मोठे राजकारणी बनवले आणि खूप काही शिकवले. पक्ष कालपर्यंत काही लोकांसाठी चांगला होता आणि आता वाईट झालेला दिसतो. मला वाटतं एकनाथ शिंदे यांचा हेतू साध्य झाला असेल तर हा मुद्दा आता संपला पाहिजे”, असे आवाहन संजय जाधव यांनी शिंदे गटाला केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!