Share

घाणेरड्या राजकारणापासून दुर होऊन सरकारने कोराेना परिस्थिती निट हाताळावी : आमदार बोर्डीकर

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरसरकारने कोणत्याही घाणेरड्या राजकारणात न पडता, कोण दोषी कोण अपयशी या राजकारणाच्या मुद्दापासून दुर जावून कोरोनाची परिस्थिती हाताळायला पाहीजे असल्याचे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी समाजमाध्यमावरुन राज्य सरकारला टीका करत टोला मारला आहे.

कोराना रुग्ण बरे करणे, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक प्रमाणात मिळवून देणे, तसेच रेमिडेसिवीर तसेच लसीकरणाचा तुटवडा होवू न देता नागरिकांच्या आरोग्या सुधारेल, चांगला पुरवठा कसा होणार या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने घाणेरड्या राजकारणापासुन दुर राहणे गरजेचे आहे. तरच कोराेना सारख्या आजारावर लक्ष देवून स्वत:चे अपयश दुर करण्याकडे देखील लक्ष देऊ शकाल. तसेच कोरोनाची परिस्थिती सांभाळण्यात सरकारला अपयश येत असल्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पहावयास मिळत आहे.

त्यामुळे कोरोना या संसर्गाला कसे संपवता येणार आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यांची काळजी घेण्याची खरी गरज आज निर्माण झाली आहे. सरकारने कुरघोड्या करत बसण्यापेक्षा कोराेनाचे रुग्ण कसे वाढत आहेत. ते कमी कसे करता येऊ शकेल, या कडे  लक्ष देण्याची खरी गरज निर्माण झाली असल्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी समाज माध्यमातून राज्य सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!