लातूर: कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अरी देखील नागरिक विनकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा लोकांची संख्या कमी करण्यासाठी आता मोकाट फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारपासून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरीक शहरात फिरत आहेत. लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र लातूर शहरात अनेक दिवसांपासून बघायला मिळत आहे. वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी घेतला आहे.
शहरातील गांधी चौकातील जलकुंभ परिसरात असणाऱ्या झोनल कार्यालयात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, पोलीस निरीक्षक संजय हिबारे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
- संपूर्ण देशच लॉकडाऊनच्या उंभरठ्यावर ? उच्चस्तरीय बैठकीत एकमत !
- अधिक बेड वाढविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची आयएमएच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
- कोरोना काळात आयपीएल काय खेळताय ? ; IPLवर भडकली राखी सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

