Share

‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’

Published On: 

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मात्र अद्याप विलीनीकरणाच्या मागणीवर शासनाने तोडगा काढला नाही. यावर चित्रा वाघ यांनी टिका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय. नोकरी घालवणं. उपाशी मारणं. बेघर करणं. आत्महत्येस प्रवृत्त करणं. हाच का महाविकास आघाडी सरकारचा कॅामन मिनिमम प्रोग्राम? या सरकारला कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मुंबईतील आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात सर्वच भाजप नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप नेते गोपीचंद पडळकर हे दोन दिवसांपासून आझाद मैदानावर तळ ठोकून आहेत. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!