मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. आपल्या या पत्रात पडळकर यांनी विविध मुद्दे मांडले असून अहमदनगर या जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ असे ठेवा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली आहे.
“अहिल्या भक्तांच्या मागणीनुसार अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे, असे पत्र मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करून ते सिद्ध करतील की, ते शरद पवार यांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे मुख्यमंत्री नाहीत.”, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
आप शरदचंद्र पवार की रिमोट कंट्रोलसे ऑपरेट होने वाले मुख्यमंत्री नहीं है.. जय अहिल्या..जय मल्हार…@BJP4India@BJP4Maharashtra @CMOMaharashtra #AhilyadeviHolkar
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) June 2, 2022
दरम्यान हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, अशा आशयाचे पत्र पडळकर यांनी लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; बाळासाहेब थोरात म्हणाले…
- आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”
- केकेला श्रद्धांजली वाहण्यावरून बादशाहला नेटकऱ्याने विचारले, तु कधी मारणार? तो म्हणाला…
- सोनिया गांधींना ईडीच्या नोटीसीनंतर भाजप नेत्याचा मोठा खुलासा; म्हणाले, “2019 मध्ये ईडीने…”
- काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर भाजपमध्ये पटेलांचं ‘हार्दिक’ स्वागत! गांधीनगर येथे पक्षप्रवेश


