Share

‘अजितदादा, तो माईचा लाल आता महाराष्ट्राला मिळालाय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अवघ्या राज्याचं लक्ष लागलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येऊन या निवडणुकीसाठी जोर लावला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यावर भाजपने झेंडा फडकावल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, या निकालानंतर अजूनही टीका-टिपण्णीच सत्र सुरु आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघडीला लक्ष्य केलं आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे, असं विधान पडळकर यांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीपूर्वी १५ ते २० दिवस अशी वक्तव्य होती की आम्ही ५० ते ८० हजार मतांच्या फरकाने निवडून येणार आहोत. अजितदादांचं वक्तव्य होतं की ४ पक्षांपैकी ३ पक्ष आम्ही एकत्र आहोत. असा कोणता माईचा लाल आहे जो निवडून येईल? तो माईचा लाल समाधान अवताडेंच्या रुपाने महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे आविर्भावात वागत होते की आम्ही तिघं एकत्र आहोत, त्यामुळे जे आम्ही म्हणू तेच होईल. विश्वासघातानं सत्तेत येता येतं, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत,’ अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!