मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.
अखेरच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. जर हा सामना अनिर्णीत झाला तर विजेतेपद दोन्ही संघाना विभागुन देण्यात येईल. तसेच विजयाची रक्कमही दोन्ही संघाना समान विभागुन देण्यात येणार आहे. आयसीसीच्या या नियमावर भारताचे माजी क्रिकेटपटु सुनील गावसकर यांनी नाराजी दर्शवली आहे. त्यांच्या मते फुटबॉल मध्ये सामना अनिर्णीत झाला तर पेनल्टी शुटआउटच्या आधारे विजेता ठरवला जातो. याप्रकारे आयसीसीने सामना अनिर्णीत झाला तर असाच काही उपाय शोधायला हवा असे ते म्हणाले.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात २१७ धावांची मजल मारली होती. प्रत्त्युत्तरात न्युझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. यानंतर भारताने दुसऱ्या डावात २ गडी गमावुन ६४ धावांची मजल मारली होती. या सामन्यातील पहिल्या आणि चौथ्या दिवसी पावसामुळे एकही चेंडु न खेळता खेळ रद्द करण्यात आला होता. तर ज्या तिन दिवसात खेळ झाला त्यातील दोन दिवसात अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ अर्ध्यातच थांबवावा लागला. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहण्याची दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता’ ; वॉनने पुन्हा एकदा उडवली टीम इंडियाची खिल्ली
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

