Share

Gajanan kale MNS | छोटे नवाबांनी शिल्लक यात्रा काढावी ; गजानन काळेंचा आदित्य ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेचे विश्वासू नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार एवढेच नव्हे तर मंत्र्यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेशी बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या पाठिंब्याच्या जोरावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनतर आता शिवसेना या धक्क्यातून सावरत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने राज्यात निष्ठा यात्रा सुरु केली आहे. यावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘छोटे नवाब’ असा केला आहे.

गजानन काळे म्हणतात, “दुसऱ्याला संपलेला पक्ष म्हणता म्हणता छोटे नावाब यांचा पक्ष आता महाराष्ट्र नावाला तरी शिल्लक राहणार आहे की नाही असे चित्र निर्माण झाले आहे. लोक पक्षातच राहावे म्हणून छोटे नवाब यांनी निष्ठा यात्रा सुरू केली. मात्र त्याचे उलटे परिणाम झाले. आमदार गेले, नगरसेवक गेले आणि आता पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सुद्धा यांना सोडून जाऊ लागले आहेत. मला वाटते आता निष्ठा यात्रा बंद करून छोटे नवाब यांनी राहिलेल्यांसाठी ‘शिल्लक यात्रा’ काढावी”.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!