औरंगाबाद : आजपासून औरंगाबाद शहर संपूर्णतः अनलॉक होत आहे. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये असणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यांना प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. मात्र यासाठी मनपा प्रशासनाने कुठलेही वेगळे नियोजन केलेले नाही. महानगरपालिकेची आधीपासूनच जी केंद्रे आहेत त्याठिकाणीच व्यापारी जाऊन तपासणी करु शकतात असे मनपातील सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात कुठलेही आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र कोरोना चाचणी करण्यापेक्षा लसीकरण करावे. आणि व्यापारी वर्गाला आरटीपीसीआर करण्यातून मुक्त करावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
आजपासून सर्व दुकाने खुली करण्यात आली आहेत. मात्र व्यापारी वर्गाला पाच ते सात दिवसांत आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. परंतु आता कोरोना लसीकरण झाले आहे मग पुन्हा आरटीपीसीआर कशासाठी? असा प्रश्न व्यापारी वर्गाकडून उपस्थित केला जात असून आरटीपीसीआर करण्यापेक्षा लसीकरण करण्यात यावे अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.
मार्केट आजपासून सुरू झाल्याने व्यापाऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी धडपड सुरू असताना त्यात आरटीपीसीआरची अट घालून दिली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला आता पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अगोदर व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात कोरोना तपासण्या केल्या होत्या. इतकेच नव्हे तर लसीकरण देखील केले आहे. लस घेतली असताना आता कोरोनाची चाचणी कशासाठी करायची? असा प्रश्न व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार ; देवेंद्र फडणवीसांचा दावा
- अनलॉकच्या दिवशी पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी; आज दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या
- ‘मोदी सरकार म्हणजे जनतेची लुटमार करणारे सरकार’
- औरंगाबादेतील मटका अड्डे उद्ध्वस्त, पोलिसांची धाडसी कारवाई
- ‘कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ व्हावी, सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी’


