मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1386298231856893955?s=20
आता, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मोफत लसीकरण होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. ‘महाविकास आघाडीने राज्यातील जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस राज्य सरकार देणार असून याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनापासून अर्थात १ मे पासून करण्यात येणार आहे धन्यवाद..’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- शरद पवारांच्या आवाहनाला ‘या’ कारखान्याचा प्रतिसाद; सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती
- १८ वर्षांवरील व्यक्तींना लस घेण्यासाठी नोंदणी अनिवार्य; नोंदणी कशी करणार ? घ्या जाणून
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

