🕒 1 min read
रत्नागिरी : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.
सीबीआयच्या या कारवाईवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी संशय व्यक्त केला असून भाजपने मात्र सीबीआयच्या कारवाईच स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी यांनी सीबीआयच्या कारवाईवर शंका उपस्थित करत देशात मोघलाई आल्याचं वाटत असल्याची टीका केली आहे. ‘सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. धाड टाकल्यानंतर जे आक्षेपार्ह वाटलं असेल ते तिथेच जनतेसमोर आणायला हवं. प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष कळण्याआधीच धाड घालुन आणि बाहेरचे सामान-वस्तू आत घेऊन जाण्याची घटना घडली आहे.’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं होतं.
जयंत पाटील यांच्या या विधानाचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत,’ असा खोचक टोला देखील निलेश राणेंनी लगावला आहे. आज त्यांनी माद्यांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘बदल्यांतून कमावलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरू करा’, खा.विखेंचा थोरातांना टोला
- शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मेहबूब शेख यांच्या तक्रारीवरून २७ जणांवर गुन्हा
- राज्यातील गरीब जनतेला मोफत लस मिळणार का ? अजित पवार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
