अमरावती : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपातील संघर्ष वाढत असल्याची चिन्हे पहायला मिळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशांमुळे यंदाही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपाला आता माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.