🕒 1 min read
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि फवारणीची कामं सुरू केली आहे. दरम्यान मंगळवार २७ सप्टेंबरपर्यंत राज्यात कमी अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या माहितीनुसार वायव्य भारतात प्रतीचक्राकार वारे निर्माण झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड व दिल्लीमधून लवकरच मान्सुन निरोप घेण्यासाठी वातावरण अनुकूल आहे. बंगालचा उपसागरात बंगाल-ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
या हवामान शास्त्रीय परिस्थितीमुळे विदर्भात २२ सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ आणि २२ सप्टेंबरपर्यंत विदर्भात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ सप्टेंबरला अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
२३ तारखेलाही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे २७ सप्टेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे काटेपुर्णा, वान, दगडपारवा, पोपटखेड, मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा जमला आहे. हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | “…आता बोलणारे तेव्हा काय करत होते?” शिंदेंचा विरोधकांना सवाल
- Saamana | “महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे, बाकी..” सामना आग्रलेखातून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके’ कंपनीत झाली आहे”
- Deepak Kesarkar | “ज्यांनी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली त्यांनी…” उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Uddhav Thackeray । आदिलशाह, निजामशाह यांच्या कुळातले शाह, त्यांना आस्मान दाखवणार; उद्धव ठाकरेंची गर्जना
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले…
- Uddhav Thackeray | वशंवादावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
