मुंबई : वेदांता-फॉकस्कोन प्रकल्प गुजरातला गेल्याचं कळल्यापासून महाराष्ट्रीतील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा प्रकल्प राज्यातून जाण्यामागे सत्ताधाऱ्यांची चूक आहे असं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तर सत्ताधारी या सगळ्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्यचं म्हणत आहेत. अशातच पुन्हा एकदा शिवसेना पक्षाने आपलं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेख मधून सत्ताधाऱ्यांवर निधाणा साधला आहे.
काय म्हटलंय सामना अग्रलेखात ?
महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके’ कंपनीत झाली आहे. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणुकदारांची पळापळ सुरू आहे, असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजप-शिंदे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
नाहीतर महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल-
काही लोक असे असतात की, ते ज्याची सत्ता तिकडे आपली टोळी जोडतात व पेंढाऱ्यांप्रमाणे लूट करतात.उद्योग, व्यापार वगैरेंसाठी असे वातावरण निर्माण होणे बरे नाही. त्यात महाराष्ट्राचे हित आहे काय? याचा विचार फडणवीस यांनी करायचा आहे. मुंबई-महाराष्ट्राचे वैशिष्टय. मुंबई सगळ्या देशाचे पोट भरते, पण मुंबई-महाराष्ट्राच्या पोटावर लाथ मारून कोणी वेगळे काही करत असेल तर मात्र महाराष्ट्राला वाघाचा पंजा मारावा लागेल.
फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून हिसकावून नेल्यापासून फडणवीस सरकार हे सगळय़ांच्याच टीकेचे लक्ष्य बनले आहे. शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे फडणवीसांवर राजशकट हाकण्याची जबाबदारी आहे. म्हणूनच ‘फॉक्सकॉन’ प्रकरणात फडणवीस काय म्हणतात याकडेच गांभीर्याने पाहिले जाते. तसेच, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंवर शिवसेना फोडण्याची, गणपती दर्शन, उत्सव मंडळे, पूजा, लग्न समारंभांना भेटी देण्याची जबाबदारी आहे, असं म्हणत शिवसेनेने शिंदेंना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बावनकुळेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले…
- Uddhav Thackeray | वशंवादावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल म्हणाले…
- Shivsena Melava: फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक – उद्धव ठाकरे
- Uddhav Thackeray । गिधाडांना मुंबईचा लचका तोडू देऊ नका; उद्धव ठाकरेंच शिवसैनिकांना आवाहन
- Uddhav Thackeray | महिनाभरात निवडणुका घ्या, उद्धव ठाकरे यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान


