औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन एक महिना होत आहे. तरी सुद्धा सावळदबारा परिसरात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील पिके धोक्यात आली आहे. वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून सावळदबारा येथील महादेवाच्या मंदिरात शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते व ग्रामस्थांनी महाआरती केली.
सावळदबारा परिसरात पाऊस नसल्याने पिके सुकून चालले आहेत. पाऊस पडावा याकरिता देवाकडे साकडे घातले जात आहे. सावळदबारा परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता. नंतर अजूनही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतक-यांनी पेरलेले बियाणे खराब झाले आहे.
त्यामुळे वरुणराजाचे आगमन व्हावे म्हणून येथील महादेवाच्या मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख गुलाबराव कोलते, रमेश खराटे, एकनाथ सपाटे, दिनकर शिप्लकर, विजय रावळकर, बाबु सपाटे, दैलात सपकाळ, समाधान कपाटे, अतुल चव्हाण, सदिप सूर्यवंशी, सुदाम खराटे, मुकेश रावळकर, सागर वाकेकर आदी होते.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

