मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमजीत सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल कोश्यारी यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसूल करण्याचे सांगितल्याचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयने सुमारे एका महिन्यांपूर्वी देशमुखांच्या घरावर छापा टाकला होता. तर आता ईडीनेही देशमुख यांच्या घरावर छापा टाकला आहे.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही भाष्य केले आहे. ‘फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे, अनिल देशमुखजी. ही सुरुवात आहे, लिस्ट बरीच मोठी आहे…’ असे ट्विट भातखळकर यांनी केलेय.
फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे, @AnilDeshmukhNCP ही सुरुवात आहे, लिस्ट बरीच मोठी आहे… pic.twitter.com/12P07fiTta
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
तर दुसरीकडे काही दिवसात शिवसेना नेते अनिल परब यांचीही अशीच अवस्था होणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘अनिल देशमुखच्या घरी आज ‘ईडी’ चे छापे पडल्याने त्यांची काही दिवसांनी जेलमध्ये रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकत्ता कंपन्याद्वारा स्वतःचा कंपन्यामध्ये वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्यामुळे ३ वर्ष जेलमध्ये होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कलम ३७० आमची ओळख, त्यासाठी सदैव लढा देणार’ मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
- डेल्टा प्लस व्हेरियंट संदर्भात राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न
- ‘तो काळा दिवस विसरता येणार नाही’, आणीबाणीवरून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली!’
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

