नवी दिल्ली : २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
The #DarkDaysOfEmergency can never be forgotten. The period from 1975 to 1977 witnessed a systematic destruction of institutions.
Let us pledge to do everything possible to strengthen India’s democratic spirit, and live up to the values enshrined in our Constitution.
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं की, आणीबाणीचे काळे दिवस कधीच विसरता येणार नाहीत. १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थानांचा विद्ध्वंस झाला. आपण भारताच्या लोकशाहीची भावना भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. असं आवाहनही मोदींनी केलं आहे.
This is how Congress trampled over our democratic ethos. We remember all those greats who resisted the Emergency and protected Indian democracy. #DarkDaysOfEmergency https://t.co/PxQwYG5w1w
— Narendra Modi (@narendramodi) June 25, 2021
पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर भाजपच्या इन्स्टाग्राम अकाउंटची एक लिंक शेअर करताना म्हटलं की, काँग्रेसनं आपल्या लोकशाहीला अशा प्रकारे तुडवलं. आम्ही त्या सर्व महान लोकांचे स्मरण करतो ज्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि भारताच्या लोकशाहीचं संरक्षण केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली!’
- कबीर बेदींनी मुलाच्या आत्महत्यानंतर व्यक्त केलं दुःख
- ‘जर झेपत नसेल तर राजीनामा द्या’, सुप्रिया सुळेंनी महापौरांना सुनावले
- इतर पक्षातील नेते आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा सर्वपक्षीय नेते का करत आहेत ?
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

