Share

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांनी लस पैसे देऊन घ्यावी – सचिन खरात

Published On: 

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकार नागरिकांना मोफत लस देण्याचं गांभीर्याने विचार करत आहे परंतु कोरोना महामारी मुळे राज्यसरकार आर्थिक संकटात सापडले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक सक्षम असणाऱ्या नागरिकांनी पैसे देऊन लस घ्यावी असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात सरसकट लोकांना लस मोफत द्यायची का याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तसेच मंत्र्यांमध्ये मतभिन्नता आहे. गरीब जनतेला लस मोफत देण्यात यावी याबाबत मंत्र्यांमध्ये एकमत आहे. पण ज्या वर्गाला पैसे देऊन लस घेता येईल त्यांनी ती विकत घ्यावी अशीही भूमिका काही मंत्र्यांची आहे.

राज्यात वय वर्ष 18 ते 45 मध्ये पाच कोटी नागरिक येतात. याचा अर्थ या नागरिकांना 10 कोटी लसींचे डोस लागणार आहेत. सरसकट सगळ्यांना लस मोफत द्यायची झाली तर साधारण राज्य सरकारवर चार हजार कोटींचा भार येऊ शकतो. त्यामुळे सरसकट लस सगळ्यांना मोफत देण्याऐवजी गरिबांनाच लस मोफत द्यावी, ज्यांना परवडत त्यांनी पैसे देऊन घ्यावी असेही काही मंत्र्यांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!