🕒 1 min read
मुंबई : शिवसेनानंतर काँग्रेस आणि आता भाजपमध्ये असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे अखेर पुनर्वसन झाले आहे. संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात ते मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे नारायण राणेंना संधी मिळेल का? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदाची इच्छा लपलेली नाही. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र, तसे झाले नाही. अखेर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र, भाजपमध्येही त्यांचा निभाव लागेल, या बाबत कायमच शंका उपस्थित केल्या जात होत्या.
भाजपमध्ये आल्यानंतर राणे यांना मोठी संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र, तसे झाले नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाल्याने राणेंच्या मुलाला असलेली मंत्रिपदाची अपेक्षाही बारगळली होती. मात्र, आता केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होत असून संध्याकाही सहा वाजता शपथविधी होणार आहे. त्यामुळे अखेर भाजपमध्ये नारायण राणेंचे राजकीय पुनर्वसन झाले असे म्हणता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रीतम मुंडेंची संधी हुकली, ‘भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय’
- काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत कृपाशंकर सिंह यांनी केला भाजपात प्रवेश
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
