मुंबई : आज संध्याकाळी 6 वाजता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै, म्हणजेच आज मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी अनेक बड्या नेत्यांची नावे चर्चेत होते. नारायण राणे, प्रीतम मुंडे, हिना गावित, कपिल पाटील आदी नेत्यांचा यात समावेश होता. राणेंसह प्रीतम मुंडे यांचे देखील नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मात्र, मुंडेंची संधी हुकली आहे. ज्या नेत्यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होऊ शकतो अशा सर्वांनी राजधानी दिल्ली गाठलीये. मात्र, प्रीतम मुंडे या मुंबईतच असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. ‘गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे तिला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजपच्या ओरिजनल ओबीसी चेहऱ्यावर अन्याय झालाय. भागवत कराड ओबीसी आणि वंजारी समाजाचे आहेत. पण गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला खरा ओबीसी चेहरा दिला होता. तो मात्र या मंत्रिमंडळात नाही आहे,’ असं शेंडगे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- दिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत – नाना पटोले
- काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत कृपाशंकर सिंह यांनी केला भाजपात प्रवेश
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी राशिद खानची अफगाणिस्ताच्या कर्णधारपदी निवड
- श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
- मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा?


