Share

‘कोरोनाशी लढा, मोदींसोबत नाही’, केंद्रिय मंत्र्यांचा हेमंत सोरेन यांना टोला

Published On: 

नवी दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आता मोदींना थेट आव्हान दिले आहे. सोरेन यांनी पंतप्रधान मोदींसोबत कोरोना परिस्थितीवर काय चर्चा झाली ट्विटद्वारे सांगितले आहे. ‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. यावेळी त्यांनी फक्त त्यांची मन की बात केली. त्यापेक्षा त्यांनी कामाची गोष्ट केली असती आणि कामाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं’, असा टोला हेमंत सोरेन यांनी ट्विटमधून लगावला आहे. झारखंडमध्ये कोरोनाचं संकट निर्माण झालेलं असतानाही केंद्राकडून काहीच मदत झाली नसल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे.

त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी हेमंत सोरेन यांना उत्तर दिले आहे. “देशाच्या पंतप्रधानांविषयी विधान करताना त्यांनी हे विसरू नये की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही साथीची रोगाची समस्या सोडविली पाहिजे, आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करताना पंतप्रधान मोदींवर रोष व्यक्त करणे चुकीचे आहे, अशी नाराजी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच ‘कोरोना संकटात केंद्र सरकारने गरीब आणि गरजू लोकांसाठी तिजोरी उघडली असताना झारखंड सरकारने आपली तिजोरी बंद ठेवली आहे. हेमंत सोरेन यांना वाटतं की सगळी कामं केंद्रानेच करावीत. कोरोनासोबत लढा पंतप्रधानांशी नाही’ असा टोला आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!