मुंबई : देशात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा आणि नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी विविध उपाययोजना करून कोरोना हद्दपार होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा. त्यातून मार्ग काढा. पंतप्रधान मोदी हे एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
मलिक म्हणाले की, पूर्वी विरोधक जे बोलत होते, तेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी आता बोलत आहेत. देशात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा देखील तुडवडा आहे. मोदींच काहीच नियोजन नाही. आधी अधिकार घेतले आणि परिस्थिती हाताबाहेर जात असताना केंद्र हात झटकत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले. सर्व देशातील नेत्यांची बैठक मोदींनी बोलवावी आणि परिस्थिती समजून घ्यावी. विदेशातून सामान येत आहे. परंतु, त्याचे वाटप देखील होत नाही. केंद्राने मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, देशातील कोरोनाच्या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांना राज्यांतील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. मोदींनी औषधांचा तुटवडा, लसीकरण याबाबत निर्देश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन
- रेमडेसिवीर इंजेक्शन गरिबांना सरकारी शुल्कात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
