Share

JALGAON | सततच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी सरकारकडून पंचनाम्याच्या अपेक्षेत, शासन कधी देणार आदेश

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे शेतीचे फार नुकसान झाले असून शेतकरी राजा मोठ्या संकटात आहे. चोपडा तालुक्यात पूर्व हंगामी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असते. सततच्या पावसामुळे या कापूस शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ज्यांनी कर्ज काढून शेतीची कामं केली होती त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकार कडून आर्थिक मदत कशी मिळू शकते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या परिस्थिविषयी एक कापूस उत्पादक शेतकरी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, चोपडा तालुक्यात पूर्व हंगाम कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते गेल्या आठ-दहा दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्याने कापसाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापूस खराब होतोय कापसाच्या बोंडाला कोंब फुटत आहे शेतकऱ्यांच्या खर्च भरमसाठ झाला आहे मात्र या सततचा पावसामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे लागलेला खर्च तो देखील निघणार नाही सरकारने तात्काळ पंचनामाच्या आदेश द्यावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे शासन फक्त घोषणा करीत असतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही शासनाने घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!