Share

रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका

Published On: 

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्वीटनंतर सोशल मीडिया विभागला गेला आहे. असे असले तरी रिहानाचा विरोध करण्यात बॉलीवूड सेलिब्रिटींनीही पुढाकार घेतल्याचे नुकतेच दिसून आले. अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी तसेच दिग्दर्शक करण जोहर यांनी बाहेरच्या लोकांनी भारतातील प्रश्नांत नाक खुपसण्याची गरज नसल्याचे म्हटले.

बुधवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाही रिहानाच्या ट्विटवरून प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, हा आमच्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, इतर कोण-काय बोलतो यात अजिबात इंटरेस्ट नाही. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयानेही नुकतेच एक निवेदन जारी केले असून भारताच्या अंतर्गत प्रश्नावर इतर कोणाचाही दखल खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हटले. बाहेरच्या लोकांना त्यांचा प्रपोगेंडा अजिबात चालवू देणार नसल्याचे त्यात म्हटले आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील कडक पोलीस बंदोबस्तावरून मोदी सरकारवर टीकेची तोफही डागली आहे. राहुल गांधी म्हणाले की, सरकारचे काम शेतकऱ्यांना धमकावणे आणि मारणे नाही. दिल्लीत एवढी बॅरिकेडिंग का करण्यात आली आहे? शेतकरी तुमचे शत्रू आहेत का? ते म्हणाले की, सरकारने तातडीने शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. कृषी कायदे मागे घेतले जावेत, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी देशाला तारून नेले आहे, शेतकरीच या देशाचा कणा आहेत. पण सरकारने मात्र त्यांना बरबाद करायचे ठरवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!