पुणे : अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये आजचा त्यांचा दौरा ठरलेला आहे.
ओल्या दुष्काळामुळे विदर्भासह मराठवाड्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने राजकारण न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, एक दुसऱ्याकडे बोट दाखवून काहीही होणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचं आहे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला व्यक्त केले होते. नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांच्या या मागणीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख मराठवाड्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना मदत करणे हे महत्त्वाचे आहे. त्याला ओला दुष्काळ नाव द्यायचे की अजून काही हा नंतरचा विषय आहे. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले हे पाहावे लागेल. मोजदाद केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती थोरात यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
- ‘जलसंपदाचे कुठलेली कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही’, मंत्री जयंत पाटलांची स्पष्टोक्ती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

