Share

हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन ; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी झाला रक्तबंबाळ

Published On: 

नवी दिल्ली : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत याचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी टोल ब्लाझा येथे चक्का-जमा होत आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दुपारी पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आले.

दरम्यान, तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बैठकीसाठी आलेल्या भाजप नेत्यांच्या गाड्या थांबवण्याचाही प्रयत्न केला. यानंतर महामार्गावर ठिय्या ठोकून रास्ता रोको केला. करनाल येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या लाठीचार्जवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी शरसंधान साधले. 5 सप्टेंबरला मुजफ्फरनगर येथे होणाऱ्या महापंचायतपासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने रचलेले हे षडयंत्र असल्याचे आंदोलनाचे नेते आणि भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!